मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १ महिन्यापासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील काही डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. आता सरकारनेही दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा घोषणा केली आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
सरकारने पगारवाढीचा घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्यानुसार काल कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या वेतनवाढीप्रमाणे वेतन मिळाले आहे. राज्यातील काही एसटीचे आगार बंद असले तरी बऱ्यापैकी भागातून आता लाल परी रस्त्यावर उतरली आहे. कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात अजूनही संप सुरु असल्याने आता महाराष्ट्र पारिवहन मंडळाने कारवाईचा बडगा संपकाऱ्यांवर उचलला आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या १० हजार ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने बुधवारी रात्री जाहीर केली. याचबरोबर दोन हजार १४ रोजंदार कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली.
आंदोलन करणारे एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने तब्बल एक हजार ९९६ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राज्यातील ११५ आगार पूर्णपणे, तर १३५ आगार अंशतः बंद आहेत. दरम्यान, तब्बल ३० दिवसांनंतर बुधवारी राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातून दोन बसेस येवला ते नाशिक मार्गावर धावल्या. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीन चालक आणि दोन वाहक बुधवारी कामावर हजर झाले.
Read Also :
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
- शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
- शिवसेनेने छाटले रामदास कदमांचे पंख; दापोली विधानसभा क्षेत्रात माजी आमदार सूर्यकांत दळवी पुन्हा सक्रिय
- एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
- पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत