औरंगाबाद – राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांकडून मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात औरंगाबादचाही समावेश आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी शिवसेनेने मनसेला एक धक्का दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का दिला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मनसेतील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने मनसेला हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनसे गळकं घर असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वगृही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही. इथे प्रवेश मिळतो, पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सुरात सूर मिसळत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मनसे नवीन घर आहे, म्हणून आम्ही त्यात प्रवेश केला होता. पण तिथे थंडीत कुडकुडण्याशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही, त्यामुळे आम्ही जुन्या घरात परत आलो.
औरंगाबाद मनपाच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने खेळी खेळत मनसे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे याचा परिणाम मनसेच्या मतांवर होईल असं बोललं जात आहे. आता आगामी काळात हे कळेल की शिवसेनेने खेळलेली ही खेळी किती यशस्वी ठरते.
शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसोबतच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असो या निवडणुकींविषयी बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांचा दौरा कधीपासून सुरुवात करायची या विषयावर चर्चा झाली होती.
Read Also :
- “त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं
- कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
- विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त; महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलणार राजकीय गणिते
- काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला; अपक्ष उमेदवार आणि बावनकुळेंमध्ये थेट लढत होणार!
- पाच नाही तर पंचवीस वर्षे महाराष्ट्रात ठाकरे सरकार टिकणार; खासदार सुप्रिया सुळेंचा दावा