जालना : आपण एकत्र आल्यामुळे सरकार आपल्यासमोर झुकले आहे. प्रथमच सर्व पक्षांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात ठराव करण्यात आला आहे. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. स्वातंत्र्यानंतर एखाद्या प्रश्नावर प्रथमच सर्व पक्ष एकत्र आले आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडणार असल्याचं सुतोवाच केलं आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या,” संभाजी भिंडेंची मागणी
काल मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहे. हा संदेश घेऊन मंत्री संदीपान भूमरे, अर्जून खोतकर जालन्यातील उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मराठा आरक्षणासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा…अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई, कोर्टात टिकणारं आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर एका दिवसात काढला तर तो न्यायालयात टिकणार नाही. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल. आम्ही आरक्षण देतो. एक महिना द्या, असे सरकारचे म्हणणे आहे. टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणामागे सरकार प्रथमच उभे राहिले आहे. ज्यांनी महिलांवर लाठीचार्ज केले, ते सर्व निलंबित होणार आहे. सरकारच्या या विषयावर दोन बैठका झाल्या असल्याचंही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका
हेही वाचा..शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ अपक्ष आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, ठाकरे गटाची मोठी खेळी