भंडारा : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भिषण आहे, शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करत आहे. असा गंभीर आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला आहे.
हेही वाचा…अकोला हादरलं..! मुंडन करून सिगारेटचे चटके देत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार, कारवाई करण्याची मागणी
पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील अशांततेला एक-दोन मंत्री नाही तर सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अशांतता निर्माण करुन ‘जळता महाराष्ट्र’ करुन ठेवला आहे, हे अत्यंत निषेधार्ह असून राज्य जळत असताना सरकार मात्र मजा बघत आहे. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चितावणीखोर विधाने करत आहेत, या मागे सरकारच आहे, राज्यपाल महोदयांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या ५० ते ६० पदाधिकाऱ्यांना पाठवल्या नोटीसा, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय ?
दरम्यान, आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजपा व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली व मागील ९ वर्षात भाजपाने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस पक्ष जर राज्यात व केंद्रात सत्तेत आला तर आरक्षण प्रश्नावर मार्ग काढू. आरक्षण प्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली आहे, जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला युवक काॅंग्रेसचा विरोध, तर भीमआर्मी दाखवणार काळे झेंडे
हेही वाचा…सिगारेटचे चटके देऊन ब’ला’त्का’र करणाऱ्या गावगुंडाला जबरदस्त शिक्षा होणार, महिला आयोग अॅक्शन मोडवर
हेही वाचा…“बावनकुळेंचा जुगार खेळतांना फोटो, तर आदित्य ठाकरेंच्या हातात व्हीस्की”, भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटरवार
हेही वाचा…“भाजपच्या बड्या नेत्याने जुगारात ३.५० कोटी उडवले,”? राऊतांनी ट्विट करत ‘या’ नेत्यावर साधला निशाणा
हेही वाचा…“भुजबळांच्या ‘त्या’ भूमिकेला समर्थन नाही,” वडेट्टीवारांचं वक्तव्य, ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी ?