पुणे : १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले.
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
बंदी असताना गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन; ठाकरे सरकार कारवाई करणार ?
अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाटपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली
तर, आज स्वातंत्र्य दिन आहे. कोणताही राजकयी विषय नाही. मात्र, काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय काढला. त्यावर काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही मागणी करत आहात. पण तुमचे नेते काहीच पाठपुरावा करत नाहीत, असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं. यावरून तुम्हीच काय ते समजून घ्या. काँग्रेस नेते आणि इतरांमध्ये समन्वय नसल्याचं यातून दिसून येतं, असंही ते म्हणाले.
Read Also :
- औरंगाबादेत स्वातंत्र्यदिनी एमआयएम’ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे
- बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मी आत्महत्या करेल; खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक
- शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली
- …तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; स्वातंत्र्यादिनी मुख्यमंत्र्यांचा इशारा
- शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर कायद्याच्या कचाट्यात; लवकरच होणार चौकशी, वाचा काय आहे प्रकरण…