मुंबई : शिवसेनेचा आज मुंबई महानगरपालिकेवर पुर्ण ताकतीने मोर्चा निघणार आहे. जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आली आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाही. हे संपुर्ण प्रशासनाच्या माध्यमातून मंत्रालय आणि सध्याच्या वर्षा बंगला लुट सुरू आहे. महानगरपालिकेची या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे तरूण नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणतांना जनाची नाही तर..” राऊतांच्या टिकेनंतर भाजपचा निशाणा
तुमची राज्यात महाविकास आघाडी आहे, मग या मोर्चात राष्ट्रवादी, काॅंग्रेस का दिसत नाही. मुंबईला यांनी लुटलं आहे, हे राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला माहिती आहे. चोरी ठाकरे यांनी केली. अन् जे सोडून चालले आहेत. त्यांना असं वाटतं की या शापित लोकांसोबत आता राहू नये. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा..“समृद्धी महामार्गासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या, शाप आणि अश्रू त्यात, हा शापित महामार्ग,” संजय राऊत
तसेच बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरे यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं. मला आदित्यचा असलेला वय काय आणि त्यांनी त्याच्या शपथपत्रांमध्ये कितीतरी कोटीची संपत्ती दाखवली. हा कुठे माती कामाला गेला होता. एकदा सांगा कुठून आली संपत्ती ? काय होते तुमचे उद्योग ?कंपनी होती? असा सवाल करीत आदित्य ठाकरे यांनी विदेशी जेवण करायचं अन् शिवसैनिकांना वडापाव खाऊ घालायचा असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
हेही वाचा..पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
हेही वाचा…“..तो खरा नेता मराठा समाजाचा आरक्षणाचा कैवारी”, पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य
हेही वाचा…“सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाही”, रूपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“मणिपुरमध्ये जाऊन राहुल गांधींनी डर मत चा संदेश दिलाय, ही कृती प्रगल्भ नेत्यांचं दर्शन घडवणारी”