नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून मणिपुर मध्ये हिंसाचाराची मोठी घटना घडत आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळच्या न्यू लाम्बुलेन परिसरात घरांना जमावाने आग लावली. यानंतर लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे. या घटननेंतर मणिपुरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा आढावा घेतला नाही. यातच काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या मणिपुर दौऱ्यावर असून लोकांची संपर्क साधत आहेत.
हेही वाचा…आम्ही शिवबाचे मावळे..! मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांचे AI मधील फोटो व्हायरल
दोन ते तीन दिवसापासून राहुल गांधी मणिपुर मध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत. मणिपुर येथेली रिलीप कॅंपमध्ये जाऊन लहान मुलांसोबत, तरूण, स्त्री, पुरूषांशी ते संपर्क साधत आहेत. त्यांच्या अडीअडणी समजून घेत आहेत. यासंदर्भात त्यांचे व्हिडीओ फोटो देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा..“मुंबईतील मोर्चांने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील”, राऊतांचा भाजपवर पलटवार
धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लोकांची विचारपूस करत त्यांना धीर देण्याचं धाडस दाखवतानाच काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना डरो मत चा संदेश दिला आहे. त्यांची ही कृती अत्यंत कौतुकास्पद आणि प्रगल्भ नेत्यांचं दर्शन घडवणारी आहे. अस रोहित पवारांनी म्हटलं आहे. तर मणिपुरला शांततेची गरज आहे, हिंसेने काहीच होणार नाही, मी इथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी, जे काही करू शकतो ते करण्यासाठी तयार आहे. असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लोकांची विचारपूस करत त्यांना धीर देण्याचं धाडस दाखवतानाच काँग्रेसचे नेते राहुल जी गांधी यांनी त्यांना #डरो_मत चा संदेश दिला. त्यांची ही कृती अत्यंत कौतुकास्पद आणि प्रगल्भ नेत्याचं दर्शन घडवणारी आहे.@RahulGandhi pic.twitter.com/MjrfyWRoD4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणतांना जनाची नाही तर..” राऊतांच्या टिकेनंतर भाजपचा निशाणा
हेही वाचा..“समृद्धी महामार्गासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या, शाप आणि अश्रू त्यात, हा शापित महामार्ग,” संजय राऊत
हेही वाचा…शिंदे-फडणवीस प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल, समृद्धी महामार्गावर बस अपघात घटनेच्या चौकशीचे आदेश
हेही वाचा…“आजचा दिवस दुःखाचा..,” भाजपकडून मुंबईतील ”आक्रोश आंदोलन” मागे घेण्याची घोषणा
हेही वाचा…हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? गेल्या अनेक महिन्यांपासून निष्पाप लोकांचा गेला जीव