बुलढाणा : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठीजीवितहानी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी पी. आर. मुसदवाले यांनी दिली. या घटनेनंतर आता राज्यातील प्रमुख नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे सामोरं आलेले आहे. यापुढे असे अपघात होऊ नये यासाठी सरकारने वेळीच उपाय-योजना करून योग्य ती पावले उचलावी..! असं राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“थोडी तरी माणसात क्रेडिबिलिटी असली पाहिजे”, वरूण सरदेसाईंनी नितेश राणेंना दाखवला बाहेरचा रस्ता
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.
हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..?
हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आम्ही शिवबाचे मावळे..! मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांचे AI मधील फोटो व्हायरल
हेही वाचा“मुंबईतील मोर्चांने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील”, राऊतांचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, शरद पवारांकडून वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित
हेही वाचा…“पंकजा ताई स्वत: च्याच स्वार्थी राजकारणासाठी…..,”मराठा समाजाने पंकजा मुंडेंवर केली पहिल्यांदाच टिका
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा, राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत