मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक
या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांना ‘पवार’ नावाच्या पॉवरची किती भीती वाटते”, राष्ट्रवादीने डिवचलं
ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपूरहून पुण्याला जात असताना बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागून या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ही आग भीषण होती. आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.
READ ALSO :
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
हेही वाचा…“थोडी तरी माणसात क्रेडिबिलिटी असली पाहिजे”, वरूण सरदेसाईंनी नितेश राणेंना दाखवला बाहेरचा रस्ता
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
हेही वाचा…“विरोधकांची पाटण्याची बैठक ही राहुल गांधींच्या लग्नाची सोयरीक जुळवण्यासाठी होती”, रावसाहेव दानवेंची फटकेबाजी
हेही वाचा…“अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…”, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला