जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधक एकजूट बांधत आहेत. यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षाची पाटण्यात बैठक झाली आहे. दुसरी बैठक शिमला किंवा बंगळूरू येथे होण्याची शक्यता आहे. त्यावरून भाजपचे खासदार आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेस आणि राहुल गांधी यांना जोरदार टोला हाणला आहे.
हेही वाचा…“माझा भाऊ अन् वडिलांशिवाय राज्यातील राजकारण चालत नाही”,सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
देशातील प्रमुख विरोधी पक्ष पाटण्याला एकत्रित आले होते. त्या बैठकीत लालूप्रसाद यादव म्हणाले की राहुलजी तुम शादी करलो, असे मोदीला हटवायची बैठक होती. का राहुल गांधी यांच्या लग्नाची सोयरीक जमवायची बैठक होती काही सांगता येत नाही. असा जोरदार टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. दुसरी बैठक शिमल्याला होत आहे. त्या बैठकीत राहुल गांधी यांच्या साखरपुड्याची तारिख ठरवायला आहे का ? असा चिमटाही त्यांनी घेतला.
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होत्या. त्यावेळी त्या नेहमी सांगायच्या की प्रधानमंत्री पदाची उमेदवारी कुणाला देणार. तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण. आम्ही सांगू इच्छितो की आमचा २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी असणार. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…”, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांना ‘पवार’ नावाच्या पॉवरची किती भीती वाटते”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
हेही वाचा…“उद्याचा मुक्काम तुरूंगात असणार हे आदित्य ठाकरेंना…”, संजय शिरसाट यांचं मोठं विधान