औरंगाबाद : ठाकरे गटाचा १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी पोलिसांनी अद्यापही परवानगी दिली नाही. परंतु मुसळधार पावसात मुसळधार मोर्चा होणार असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. त्यावर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुचक वक्तव्य केले आहे.
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
मुंबई महापालिकेत गेली २५ वर्ष ठाकरे यांनी भ्रष्टाचार केला आहे. अन् तरीही आम्ही भ्रष्टाचार विरोधात हे म्हणायचं धाडस कसं होतं? आदित्य ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे की मुंबईची अवस्था अशी का झाली? आपला उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार हे आदित्य ठाकरे यांना माहिती आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आदित्य असो किंवा कुणीही असो असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. आमच्या डेड बॉड्या येतील असं म्हणत धमकावलं गेलं. पण दिवसरात्र काम करून हे सरकार आम्ही चालवलं. ज्यांना वाटत होतं हे सरकार तीन महिन्यात जाईल ते लोक अजूनही बोंबा मारतील. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. संजय राऊत यांना फसवणुक झाली वाटत असेल तर ते दुर्दैव आहे. असा टोलाही संजय राऊतांना संजय शिरसाट यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“माझा भाऊ अन् वडिलांशिवाय राज्यातील राजकारण चालत नाही”,सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश