मुंबई : पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा झाली होती. परंतु ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतल्याने अजित पवारांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनीच विकेट टाकली असं शरद पवारांनी म्हटलं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांचं सुचक विधान, भाजप-शिंदेंचे संबंध ताणले होते
माझे एक सासरे होते, सदू शिंदे. ते देशातील उत्कृष्ट गुगली बॉलर होते. त्यांनी देशातील मोठमोठ्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. मी देखील जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कसा आणि कुठे टाकायचा, हे चांगलं माहिती आहे. समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करू शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात? हे दिसून आले आहे. असं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“सरकार पडेल, पण मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचलं
दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार साहेबांना शेवटी सत्य सांगावं लागलं. याचा मला अतिशय आनंद आहे. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले. पण ते अर्धच सत्य बाहेर आलं आहे. उरलेले सत्य मी बाहेर काढेन. त्यांच्या गुगलीमुळे मी क्लीनबोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवाराच क्लीन बोल्ड झाले आहेत. अजून अर्धसत्यच बाहेर आलं आहे. उरलेलं अर्धसत्य बाहेर काढेन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर
हेही वाचा…“माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली,” फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांचा टोला
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”