मुंबई : शिवसेनेचे युवासेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी युवा सेनेला राम राम ठोकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या राहुल कनाल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यावर सेनेनेही पलटवार केला आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
महाभारतात ज्या पद्धतीने शकूनीमामाची भूमिका होती. तीच भूमिका उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत तर आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यात वरूण सरदेसाई करीत आहेत. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता वरूण सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी असेल तर त्याला आपण उत्तर देणार. मला योग्य वाटतं काय एवढी मोठी लोकसंख्या प्रत्येक मत असतं. माणूस महत्त्वाचा आहे. माणसाची क्रेडिबिलिटी असली पाहिजे. क्रेडिबिलिटी असली तर आपण त्याला उत्तर देतो नाहीतर काय कोणी उठून काही बोलायचं आणि आपण त्याच्यावर रिएक्शन द्यायची मग तुम्ही तुमचे मत घेऊन त्यांच्याकडे जाणार त्यांची रिएक्शन द्यायची. असं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्याचा मुक्काम तुरूंगात असणार हे आदित्य ठाकरेंना…”, संजय शिरसाट यांचं मोठं विधान
दरम्यान, राहुल कनाल यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जय महाराष्ट्र केलाय जय महाराष्ट्र मी देवगिरी व्यक्त करतो त्याने रात्रंदिवस काम केलं त्यांना माझ्यामुळे याचा सामना करावा लागला पण तुम्ही सत्यासाठी उभे राहिलात ही फक्त आता सुरुवात आहे दुःख होते हे कोणी केलं हे सर्वांना चांगलं माहिती आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं त्यांना ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
हेही वाचा…“विरोधकांची पाटण्याची बैठक ही राहुल गांधींच्या लग्नाची सोयरीक जुळवण्यासाठी होती”, रावसाहेव दानवेंची फटकेबाजी
हेही वाचा…“अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…”, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांना ‘पवार’ नावाच्या पॉवरची किती भीती वाटते”, राष्ट्रवादीने डिवचलं