बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्यानातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची सखोल माहिती घेत आहेत.
हेही वाचा…“पंकजा ताई स्वत: च्याच स्वार्थी राजकारणासाठी…..,”मराठा समाजाने पंकजा मुंडेंवर केली पहिल्यांदाच टिका
समृद्धी महामार्गावरील तुरळक वाहतूक व संसाधनांचा अभाव यामुळे उशिरा माहिती मिळाल्याने व मदतही उशिरा पोहोचल्याने नागपूर येथील खासगी बसच्या अपघाताची तीव्रता वाढून गेल्याची बाब समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक शनिवारी भल्या पहाटे खासगी बसचा अपघात झाला.यानंतर बस पेटली असताना सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू न शकल्याची माहिती समोर येत आहे. बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यावर त्याने फोन करून माहिती देईपर्यंत व मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा, राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
यावेळी सदर मार्गावरून व घटनास्थळावरून कोणती वाहने गेलीत, त्यांनी ही घटना बघून मदतीसाठी काही प्रयत्न केले नाहीत का? असे प्रश्न आता समोर आले आहेत.मध्यरात्रीच्या वेळी मुळात या मार्गावर वाहतूक अतिशय तुरळक असते, त्यामुळे सदर अपघाताची माहितीच न झाल्याने व जवळचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यास लागण्यापूर्वी ऐनवेळी घटनास्थळी मदतीस धावून जाणारे अन्य कोणीच नसल्याने या दुर्दैवी घटनेतील नुकसानीची तीव्रता वाढून गेली.
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
जर तातडीने माहिती मिळवून मदत पोहोचली असती तर आग विझवून किंवा गाडीच्या काचा फोडून काही जीव वाचविता आले असते. दरम्यान, पिंपळखुटा गावातील दोन जण पहाटे मोठा आवाज आल्याने समृद्धी महामार्गावर धावून गेले होते. परंतू आग लागल्यानंतर लगेच ती भडकल्याने ते दोघेही हतबल झाले होते.त्यामुळे त्यांना मदत करता आली नाही. त्या दोघांनीच नंतर सिंदखेड राजा पोलिसांना अपघाताची माहिती दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“आजचा दिवस दुःखाचा..,” भाजपकडून मुंबईतील ”आक्रोश आंदोलन” मागे घेण्याची घोषणा
हेही वाचा…हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? गेल्या अनेक महिन्यांपासून निष्पाप लोकांचा गेला जीव
हेही वाचा…आम्ही शिवबाचे मावळे..! मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांचे AI मधील फोटो व्हायरल
हेही वाचा“मुंबईतील मोर्चांने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील”, राऊतांचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, शरद पवारांकडून वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित