मुंबई : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. आरोग्यमंत्री मा.ना.श्री.राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. तर दुसरीकडे परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब टोपे यांनी दिली आहे.
परीक्षा ऐनवेळी रद्द
राज्यात उद्या आणि परवा आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गौरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात, केंद्र नोएडात
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आज परीक्षा केंद्रांवर पाहणी करून कुठल्याही परीक्षार्थींची गैरसोय होऊ देणार नसल्याचं सांगितलं होतं. परभणीतील रावसाहेब जामकर महिला महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला; 500 पुरावे घेवून शिवसेना आमदाराची कोर्टात धाव
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ” केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केद्राची पत्ता चुकला होता, तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. आठ लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असून त्याच्या योग्य प्रकारच्या नियोजनासाठी बाह्य स्त्रोत नेमण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स डाऊनलोड होत नाहीत त्यांना ईमेल्स केले जात आहेत, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनना याबाबत अधिकार देण्यात आले असून ते अशा विद्यार्थ्यांना मदत करतील, अशी सर्व तयारी झाली असल्याचे सांगितले जात असताना ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Read Also :
- मोठी बातमी: झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार; आयोगाने आदेश धुडकावला
- खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
- मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता? – अमृता फडणवीस
- परत कोणी महिलेला स्पर्श केला…; बलात्कार प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या