मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री, आमदार, खासदार देखील उपस्थित होते. परंतु आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे. यावरून आता भाजप आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात खडाजंगी बघायला मिळत आहे.
हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. कारण ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना जाऊन सांगाव की एकच शिवजंयती साजरी करावी. मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो. माझा चेक क्लीअर होतो, बाऊन्स होत नाही. असा टोला नितेश राणे यांनी मिटकरी यांना लगावला.
हेही वाचा…“छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं”, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज ठाकरे भावूक
अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो. असं अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत
राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज किल्ले रायगडावर तिथीनूसार महाराष्ट्र सरकार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतांना एकीकडे मुख्यमंत्री पुजेला खाली बसलेत मात्र दुसरीकडे छत्रपती घराण्याचे वंशज. खासदार उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं आहे. एक शिवअनुयायी म्हणून सरकारने केलेल्या दुष्कृत्याचा जाहीर निषेध असं अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यानाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो. pic.twitter.com/YPtDXjHeTN
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
हेही वाचा…“संजय राऊत थोड्या दिवसांनी स्वत:चे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार”, शिंदे गटाची जहरी टिका
हेही वाचा…आमदार अण्णा बनसोडेंचा महापालिकेला मोठा दणका, महापालिका आयुक्ताला दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा…ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?
हेही वाचा…“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ?