मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध लागू केले. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहून, लॉकडाऊन मध्ये देखील हळूहळू राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, १ जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन पुढे वाढवला जाणार का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात येत होता. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सुचक वक्तव्य केलं असून, ‘आम्ही संपूर्ण तयारीचा आढावा घेऊ आणि सर्व गोष्टी सकारात्मक असतील, तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करून, निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्याचा विचार करु शकतात. मात्र, निर्बंध एकदमच उठवले जातील या भ्रमात कुणीही राहू नये’, असा इशारा दिला आहे.
We have decided to stop home isolation for patients of 18 districts where the positivity rate is high. The patients from these districts will have to go to a quarantine center, won't be allowed home isolation: Maharashtra Health Minister pic.twitter.com/09DsGrFuUK
— ANI (@ANI) May 25, 2021
तसेच, “लॉकडाऊनमुळे बाधित आणि सक्रिय रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं, तरी अजूनही राज्यातल्या महामारीच्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने महामारीच्या चाचण्यांसंदर्भात बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला असून, इथून पुढे राज्यात उठसूट कुणाचीही महामारीची चाचणी करणं पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तश्या सक्त सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना, आरोग्य यंत्रणेला आणि संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
यावेळी, “राज्यातील ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या एकूण पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, अशा राज्यांना होम आयसोलेशन सुविधा १००% बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, बाधित रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करून तिथे आयसोलेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, राज्यातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
खालील जिल्ह्यांमध्ये आता होम क्वारंटाईन सुविधा बंद राहणार…
पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद
Read Also :
- ‘लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार, मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका’
- ‘अखेर फोन टॅपिंग प्रकरणात नोंदवला गेला, रश्मी शुक्लांचा जबाब’
- Big Breaking : दहावीच्या परिक्षांविषयी राज्य सरकार जीआर काढणार
- शिवसेनेचा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी तडफडत होता; उदय सामंत म्हणतात….
- “भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला महागात पडेल”