नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत चौथा भिडू सामील होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा जागावाटपाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी जागावाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता मनसे महायुतीत सामील झाला तर महायुतीकडून किती जागा मिळणार ? याची गोळाबेरीज सध्या राजकारणात केली जात आहे.
हेही वाचा…पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कॉंग्रेस अन् भाजपमध्ये होणार कडवी टक्कर ; राजकीय गणितं काय ?
राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे देखील अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत दाखल झाले आहेत. आज त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
मनसे महायुतीत सामील झाला तर भाजपकडून काही जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यातच मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा सोडायला तयार असल्याची माहिती समोर येत आहे. या जागेवरून अमित ठाकरे यांनी लोकसभेची निवडणुक लढवावी असा आग्रही भाजपकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबही मनसेने निवडणुक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
हेही वाचा…‘शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा, मावळ अन् शिरूरमध्ये…’ आरपीआयने दिला महायुतीला कडक इशारा
दरम्यान, मनसे महायुतीत दाखल झाला तर भाजपला मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघात मदत मिळण्याची शक्यता आहे. यातच पुणे नाशिक, भिवंडी या लोकसभा मतदारसंघातही मनसेची ताकद आहे. त्यामुळे भाजपकडून मनसेला एक किंवा दोन जागा देऊन इतर पाच जागा आपल्या ताब्यात ठेवण्याची संधी असल्याचे म्हटले जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा
हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा
हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार
हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?
हेही वाचा…“चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर की वडेट्टीवार ; राजकीय वर्तुळात चर्चा”