मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र अजूनही याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत. भाजपने नागपुरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र इतर कोणत्याही मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार अद्याप घोषीत केले नाहीत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपुर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महायुतीकडून भाजपने नागपुरमधून नितीन गडकरी तर चंद्रपुरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीकडून नागपुरची जागा कॉंग्रेसच्या वाटेला जाणार आहे. मात्र याठिकाणी गडकरींच्या विरोधात कोण निवडणुक लढणार ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर चंद्रपुरमधून मुनगंटीवार यांच्या विरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार आणि माजी खासदार बाळु धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे.
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसाला मिळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसकडून रामटेक मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिजे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 2019 साली या मतदारसंघातून किशोर गजभिजे यांनी निवडणुक लढविली होती. मात्र शिवसेनेचे नेते कृपाल तुमाणे यांनी त्यांचा पराभव केला होता. तर महायुतीकडून विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांचा पत्ता कट करून नवा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. मात्र भंडारा-गोंदिया मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. याठिकाणी भाजपकडून खासदार सुनील मेंढे यांच्यासह माजी राज्यमंत्री परिणय फुके सुद्धा रेसमध्ये आले आहेत. महाविकास आघाडीकडून भंडारा-गोंदिया मतदारसंघावर कॉंग्रेसने आपला दावा सांगितला आहे.
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला असून याठिकाणी अजित पवार यांच्या गटातील मंत्री धर्माराव बाबा आत्रम यांना कमळाच्या तिकीटावर निवडणुक लढवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागाही कॉंग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी २० मार्च रोजी याची अधिसुचना निघणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ मार्च शेवटची तारीख आहे. तर उमेदवार आपला अर्ज ३० मार्चपर्यंत माघारी घेऊ शकतो. १९ फेब्रुवारी रोजी या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी ही ०४ जून रोजी होणार आहे. संपुर्ण देशात एकूण १०२ लोकसभा मतदारसंघात ही निवडणुका होणार ्असून पहिल्या टप्प्यात २१ राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा, मावळ अन् शिरूरमध्ये…’ आरपीआयने दिला महायुतीला कडक इशारा
हेही वाचा…महायुतीत सामील झाल्यास मनसेला मिळणार दक्षिण मुंबई, तर महायुतीला ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा फायदा
हेही वाचारक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
हेही वाचा“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने