अमरावती : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या प्रकरणात आरोपीसह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे दोन पोलिस निरीक्षकांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित देखील केलं आहे. यातच आता या प्रकरणावर बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
घरात एवढा पैसा झाला की रस्त्यावर मस्ती त्यांची दिसणारच आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे. त्याच व्यक्ती अशा डॉन्स बार, पबमध्ये जातात. घरात एवढा पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच आहे. अशा अपघातामध्ये बदल होणं साहजिकच आहे. जे जे वाईट होतांना दिसत असेल तर काही डॉन्स बार, पबमध्ये जाणारा वर्ग हा त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. हे शौकिन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहे. त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावेच लागतील. असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही. त्यामुळे यामध्ये बंधन कसं येणार ? धर्म आणि जाती पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवले जात असेल. मतं खेचून घेतली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे. यातच मीडियामध्ये कॅमरामॅनला मिळणार पगार आणि एसीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला मिळत असलेल्या पगारात तफावत किती आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. असेही बच्चू कडू म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?