मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. युवासेना सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.
“आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं.
कोरोना संकटात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही – उद्धव ठाकरे
राणे म्हणाले, “आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढी त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच”, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. आपल्या पक्षाला खासदार आणि विधानसभेत राज्य येण्यासाठी आमदार पाठवणं गरजेच आहे, शिवसेना औषधालाही उरली नसली पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.
Read Also :
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; शिवसेना- भाजपात नेमंक काय चाललयं?
- …तो पर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा अपरिमित हानी; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा