मुंबई : अमरावती दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर एक फोटो शेअर करत आशिष शेलार यांच्यासोबत रझा अकादमीचे लोक काय करत आहेत असा प्रश्नही विचारला आहे. भाजपने मुंबईहून दंगली घडवण्यासाठी पैसे पाठवले असाही आरोप आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या सगळ्या आरोपांना आशिष शेलार यांनी खास शब्दांमध्ये आणि त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
यशोमती ठाकूर राजकीय पोळी भाजण्याचे काम करतायं, मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा – रवी राणा
भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दंगलीचा कट रचल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या सगळ्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.
शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
नवाब मलिक यांना मी मराठीतली म्हण पूर्ण सांगत नाही पण तुमची खोड जात नाही हे मात्र खरं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि 2016-17 मधल्या फोटोचा काय संबंध? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर तुमची ही खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमीसोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हे फोटोचं राजकारण बंद करावं असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- ‘आधी तुरुंगातील जेवण घ्या’, अनिल देशमुखांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
- ‘आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात कोणती मिटिंग करत होते?, हा षडयंत्राचा भाग होता का?’
- चित्रा वाघ आमदार होणार? भाजपकडून विधानपरिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता
- ‘..पण सत्तेसाठी पटोले तलवार मान्य करतील’, दरेकरांचा हल्लाबोल