मुंबई : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्यात आता प्रचारांचा धडका सुरू झाला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप ४०० पारचा नारा देत आहे. पण भाजपला संपुर्ण देशात ४५ जागाही जिंकता येणार नाहीत. असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला.त्यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पलटवार केलाय.
उद्धव ठाकरे हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर माझं जाहीर आव्हान आहे की, भाजप पक्ष हा ४५ जागांच्या वर गेला तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो की महाराष्ट्रात २०१९ मध्ये आमच्यामुळे १८ जागा जिंकलात. पण आता महाविकास आघाडीमुळे तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन. उद्धव ठाकरे यांना माझं खुलं आव्हान आहे. असंही आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा…आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद मतदारांना दिलं ‘हे’ आश्वासन
दरम्यान, अमित शहा यांच्या टिकेवर ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे पत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमंक स्थान काय आहे ? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचं. तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या. फडणवीस म्हणाले होते. मी पुन्हा येईन. ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत. असा हल्लाबोलही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना*
हेही वाचा..अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली ! पुण्यातील ‘ती’ पत्रकार परिषद चर्चेत
हेही वाचा…“अमित शाहांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला”, ठाकरेंकडून जोरदार पलटवार
हेही वाचा…नाशिकच्या जागेबाबत महायुतीत वाढला आणखी संभ्रम, महायुतीत भांडणं होण्याची शक्यता