नाशिक : सातारा लोकसभेतून माजी खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत हा तिढा सुटला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार भांडणं होण्याची शक्यता आहे. शिंदेंकडे असलेल्या नाशिकच्या जागेवर अजित पवारांनी सातऱ्याच्या बदल्यात उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यामुळे ही जागा आता अजित पवार गटाला गेल्यास महायुतीत भुकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर, शशिकांत शिंदेंसोबत होणार मोठा सामना
सातारा लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाच्या वाटेला आला होता. याठिकाणी भाजपने उमेदवार दिला आहे. साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा हवी आहे. मात्र ही जागा शिंदेंची असल्याने यावरून मागील काही दिवसांपासून प्रचंड वाद सुरू आहे. अशातच आता नाशिकची जागा अजित पवार गटाला गेल्यास शिंदे गट काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊन देखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तर दुसऱ्या बाजूला नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून तिढा कायम आहे. नाशिकच्या जागेसाठी बोरस्ते यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये झालेल्या भेटीने आता नाशिकच्या जागेबाबत आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद मतदारांना दिलं ‘हे’ आश्वासन
हेही वाचा…“..तर काकींचा अर्ज मागे घेऊन बारामतीत अजितदादा निवडणूक लढतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा..भाजपच्या आमदारांची धाकधुक वाढली, वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना कडक आदेश