बारामती : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असतांना अजित पवारांनी नरेंद्र मोदीसह केंद्रावर कडाडून टिका केली. मात्र आता महायुतीत सामील झाल्यानंतर अजित पवार सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक करतांना दिसत आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांची जवळीक वाढल्याचे दिसून आलं. यातच आता १४० कोटी जनतेचा नेता हा खमक्या असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा. असे आवाहन अजित पवारांनी माजी सैनिकांच्या मेळाव्यात मतदारांना केलं.
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील
यावेळी अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाचा एक काळ असतो. तुमच्या काळात तुम्ही आजी सैनिक म्हणून काम केलं. आता तुम्ही माजी सैनिक झाले आहात. आता तुम्ही रिटायरमेंटचं आयुष्य जगत आहात, लक्षात घ्या ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे भावनिक होऊ नका, 140 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे, आपल्या नातवंडाचं पत्वांडाचं भवितव्य कोण चांगल्या प्रकारे घडवू शकेल याचा विचार करा. हा विचार केल्यानंतर तुम्ही हाही विचार करा. जेव्हा तुम्ही सैन्यामध्ये होता तेव्हा तुमचा लीडर खमक्या असेल तर तुम्ही त्याच्या नेतृत्वाखाली काम करता त्याचप्रमाणे आपल्या देशाचा 140 कोटी जनतेचे नेतृत्व करणारा नेता देखील मजबूत असला पाहिजे. आज आम्ही ज्यांच्या पाठीशी उभे आहोत किंवा ज्यांचे समर्थन करतो ते आहेत नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर आज सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परदेशात देखील भारताचं नावलौकिक वाढवण्याचे काम या नेत्याने केलेला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. आता आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर गेल्यावर त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम आपल्या देशावर दिसणार आहे, मतदान करताना या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे.
विरोधी पक्षांनी आज एक तरी असा पंतप्रधान पदाचा नेता दाखवावा जो अठरापगड जाती, धर्म यांचे नेतृत्व करू शकेल. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सर्वांना एकत्र ठेवते त्याप्रमाणे देश एकत्र ठेवणारा नेता त्यांच्याकडे आहे का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. अनेकदा विरोधी पक्षावर कडून आमच्यावर टीका केली जाते की ही निवडून आले की घटना बदलतील देशात निवडणुका होणार नाहीत, देशात हुकूमशाही येईल मात्र हे खोटे आहे, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दा नसल्याने विरोधक घटना बदल किंवा संविधान बदल हा मुद्दा घेऊन प्रचार करत आहेत.
दरम्यान, बारामतीत झालेला विकास हा विकास नाही असं कोणी म्हणू शकेल का? इथून पुढच्या काळात आम्हाला बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, राजगड, खडकवासला , पुरंदर, हवेली आदी भागांचा देखील विकास करायचा आहे आणि करण्याची ताकद फक्त आज अजित पवार मध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर काकींचा अर्ज मागे घेऊन बारामतीत अजितदादा निवडणूक लढतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा..भाजपच्या आमदारांची धाकधुक वाढली, वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना कडक आदेश
हेही वाचा…सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर, शशिकांत शिंदेंसोबत होणार मोठा सामना