मुंबई : भाजपने २०२४ ची लोकसभा अत्यंत महत्वाची करून ठेवली आहे. राज्यात एव्हाना देशात विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं. तर अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लावला. अशातच राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी किमान ४५ जागा जिंकण्यासाठी भाजपने वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते असे सगळ्याच नेत्यांना कामाला लावले आहे.
देशात एव्हाना राज्यात लोकसभेच्या जास्तीत जास्त जिंकण्यासाठी भाजपने वरिष्ठ पातळीवर नेत्यांना टार्गेट देण्यात आलं आहे. यातच आता राज्यात ज्यांना आमदारकीचं तिकीट हवं असेल तर त्या विधानसभा मतदारसंघातून मोठं लीड द्यावं लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी लीड दिलं आहे. त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यात येईल. असा आदेशच भाजपने राज्यात काढला आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आता आमदार देखील झपाटून कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ ,अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
दरम्यान लोकसभा निवडणुक झाली की सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणुक लागण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने भाजपने लोकसभेची निवडणुक चांगलीच अटीतटीची करून ठेवली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्क मिळणार, त्यालाच विधानसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या प्रत्येक आमदाराचा रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक भागाचं मुल्यमापन करून विधानसभेसाठी तिकीट ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक आमदाराला आता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठं टॉक्स असणार आहे. त्यामुळे आमदारांमध्येही आता धाकधुक वाढली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर, शशिकांत शिंदेंसोबत होणार मोठा सामना
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील