मुंबई : सध्या युक्रेन रशिया युद्ध सुरु आहे. भारतातील कित्येक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. ऑपरेशन गंगा अंर्तगत अनेक विद्यार्थ्यांना मायदेशात आण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यावेळी एका विमानाचे स्वागत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की बुखारीया अमुक देशाची राजधानी आहे वगैरे वगैरे आणि ही सर्व चुकीची माहिती होती हे समोर आली आणि अधिवेशन चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली.माहिती नसताना उचलली जीभ, लावली टाळ्याला असं करत नका जाऊ. आम्हाला माहित आहे की आम्ही सर्वजण सर्वगुण संपन्न नाही. पण आपण ज्या गोष्टीत उघडे पडणार आहोत, तिथे उगाच तोंड कशाला उचकटायचं अशी टीका अजित पवारांनी राणेंवर केली होती.
महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ? ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. या सभागृहात कामी करताना सध्या सत्ताधारी पक्षाचे मंत्री काय काय उल्लेख करतात हे पाहण्यासारखे आहे. जनता ते पाहतच आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतःकडे एकदा पाहावे आणि म बोलावे. उगीच विनाकारण इतरांवर टीका करू नये. तुमच्या सगळ्यांचे व्हीडिओ बाहेर काढले तर कोण काय-काय बोलले, हे समोर येईल असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाणला आहे. आता उपमुख्यमंत्री या टीकेला कशाने उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
- पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
- राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
- न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल