जळगांव : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आता नेत्यांना रस आलेला आहे.
एसटी विलिनीकरण नाहीच; त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमशी व्यवहार असल्याच्या ठपक्यावरून ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची तब्येत काहीशी खराब असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुम्ही ईडी दाखवणार असाल तर मीही सीडी दाखवेल असं एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावे केले आहेत.
नवाब मलिकांना मोठा दणका; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, ७ मार्चपर्यंत कोठडीच
भारतीय जनता पक्ष देखील धुतल्या तांदळाचा नाही. भाजपलाही दाऊदचा इब्राहिमचा सहकारी इकबाल मिर्चीकडून देणगी मिळाली होती. एवढंच नाही तर भाजपचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांनी नाशिक येथे दाउदच्या नातेवाईकांसोबत जेवणही केले होते, असा गौप्यस्फोट नाथाभाऊंनी जळगावात केला आहे.
काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रशेखर बावनकुळे
भाजपची दुतोंडी भूमिका आता सगळ्यांच्याच लक्षात आली आहे. दाऊदशी किंवा दाऊदच्या बहिणीशी नवाब मलिक यांचे व्यवहार झालेले आहेत की नाही हे अद्यापही सिद्ध झालेले नाही. मात्र भाजपला इकबाल मिर्चीकडून देणगी मिळालेली आहे हे मात्र तंतोतंत खरं आहे. आता इकबाल मिर्ची कोणाला माहित नसेल तर तो दहशवादी संघटनेचा प्रमुख आहे असं देखील खडसेंनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. गिरीश महाजनांनी नाशिक येथे दाऊदच्या नातेवाईकांसोबत भोजन केले होते. म्हणून काय त्यांचे दाऊतच्या नातेवाईकांसोबत संबध आहेत असे म्हणता येईल का? आणि जर तसे असेल तर भाजपने याबाबत खुलासा केला पाहिजे असा खडा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.
Read also:
- पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
- राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
- न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल
- महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ? ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची टीका