मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यासोबतच लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रपतींना 6 हजार पत्र पाठवणार
अंमलबजावणी संचालनालयाने फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज मलिकांच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. ज्याबाबत आता अवघ्या काही वेळातच निकाल येणार आहे.
राज्यपालांच्या जाण्यावरून आदित्य ठाकरे म्हणतात… ‘हा तर महाराष्ट्राचा अपमान’
नबाव मलिक यांना कथित जमीन घोटाळा प्रकरणी ED कोठडी सुनावण्यात आली होती. 23 फेब्रुवारी रोजी ED अधिकाऱ्यांनी मलिकांना ताब्यात घेतले होते. तर 23 फेब्रुवारी ते 3 मार्च अशी 8 दिवसांची ED कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर 3 मार्च रोजी त्यांच्या कोठडीवर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाकडून मलिकांची आणखी 9 दिवसांची कोठडी मिळावी यासाठी ईडी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे ईडीच्या या मागणीला मलिकांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला आहे. 25 फेब्रुवारीला मलिकांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 28 फेब्रुवारीला मलिकांची पुन्हा एकदा ED कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
Read also:
- एसटी विलिनीकरण नाहीच; त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
- मलिकांना कोण वाचवतंय, बाळासाहेब ठाकरे असते तर..? सरकार विरुद्ध देवेंद्र फडणवीस आक्रमक
- ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, मंत्रिमंडळाची बैठक
- ‘राज्यपाल नव्हे तर भाज्यपाल’; अभिभाषण न करता निघून गेल्यावर राज्यपालांवर शिवसेनेची टीका
- भाजपने राज्यपालांबद्दल भूमिका स्पष्ट करावी; आक्षेपार्ह वक्तव्यांवरून काँग्रेस आक्रमक