मुंबई : राज्य सरकारने केलेले काम, तसेच सरकारची भूमिका व पुढची दिशा ही राज्यपालांच्या अभिभाषणात असते. महाविकास आघाडी सरकारने केलेले चांगले काम यावर राज्यपाल भाष्य करीत असतात. ते त्यांना ऐकायचे नसते. ते त्यांना चुकुन टाळायचे होते. हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, भाजपला महाराष्ट्राची प्रगती बघवत नाही. फक्त त्यांना खुर्ची महत्त्वाची वाटते. जुने विषय उकरून भाजप अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाहीत. परंतु आम्ही देखील पुर्ण ताकदीने त्यांना पुरून उरू. विरोधी पक्ष हा बेजबाबदार आहे.
नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला
सभागृहात राज्यपालांनी राष्ट्रगीताचा देखील अपमान केला आहे. त्यांनी अभिभाषण देखील पुर्ण केले नाही. हे फक्त भाजपच्या काही नालायक नेत्यांमुळे झालं आहे. याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतक्या मोठ्या गोंधळात राज्यपालांनी अगदी मोजक्या शब्दात अभिभाषण आटोपले. त्यानंतर लगेचच त्यांनी सभागृह सोडला.
Read also:
- भाजपने राज्यपालांबद्दल भूमिका स्पष्ट करावी; आक्षेपार्ह वक्तव्यांवरून काँग्रेस आक्रमक
- राज्यपालांच्या जाण्यावरून आदित्य ठाकरे म्हणतात… ‘हा तर महाराष्ट्राचा अपमान’
- राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रपतींना 6 हजार पत्र पाठवणार
- सभागृहातील प्रचंड गोंधळात अभिभाषणानंतर राज्यपालांनी सभागृह सोडला
- राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन