मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. विधानभवनाच्या घोषणाबाजी करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात शीर्षासन केले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यपाल सभागृह सोडून निघून गेले. यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपालांना आवडत नसेल म्हणूनच ते सभागृहातून निघून गेले असतील. महाराष्ट्राची विधानसभा असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार हा होणारच, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान, आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य राज्यापालांना शोभत नाही. भाजपने देखील यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतक्या मोठ्या गोंधळात राज्यपालांनी अगदी मोजक्या शब्दात अभिभाषण आटोपले. त्यानंतर लगेचच त्यांनी सभागृह सोडला.
Read also:
- राज्यपालांच्या जाण्यावरून आदित्य ठाकरे म्हणतात… ‘हा तर महाराष्ट्राचा अपमान’
- राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रपतींना 6 हजार पत्र पाठवणार
- सभागृहातील प्रचंड गोंधळात अभिभाषणानंतर राज्यपालांनी सभागृह सोडला
- राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन
- नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला