मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आता नेत्यांना रस आलेला आहे.
नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमशी व्यवहार असल्याच्या ठपक्यावरून ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची तब्येत काहीशी खराब असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून काल चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांच्या अटकेमुळे आणि त्यांचे संबंध देशद्रोह्यांसोबत आहेत असं म्हणून भाजपने काल चहापानावर काल बहिष्कार टाकण्यात आला होता.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
आजही अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आक्रमकपणा दाखवत थेट राजीमाना घेण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी भाजपने जोरदार घोषणाबाजी केली आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ माजला होता. नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा भाजपच्या आमदारांनी दिल्या आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा काही आमदारांनी दिल्या. यावेळी राज्यपालांनी थेट अधिवेशन सोडले आहे आणि ते निघून गेले आहेत. यावरून आमचा तर विश्वासच बसत नाही, हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रपतींना 6 हजार पत्र पाठवणार
- सभागृहातील प्रचंड गोंधळात अभिभाषणानंतर राज्यपालांनी सभागृह सोडला
- राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन
- नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश