मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात शीर्षासन केले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यपाल सभागृह सोडून निघून गेले.
धनगर समाज, यशवंत ब्रिगेडचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मागण्यांचा केला पाठपुरावा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतक्या मोठ्या गोंधळात राज्यपालांनी अगदी मोजक्या शब्दात अभिभाषण आटोपले. त्यानंतर लगेचच त्यांनी सभागृह सोडला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा द्या. महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहे का? नवाब मलिक हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करीत विधानभवनाच्या पायऱ्यावरच भाजपने आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यापालांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेमधील बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी खाली डोकं वर पाय करत राज्यपालांच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर शीर्षासन केले. तर तिकडे भाजप नेते किरीट सोमय्या देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण आता चांगलचं तापलं जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन
- नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
- नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?