नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामीशिवाय कोण विचारेल या वक्त्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांनी यावर प्रखर शब्दात टीका केली आहे. तर अनेक ठिकाणी राज्यपालांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आता याच मुद्यावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू केली आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना सहा हजार पत्र पाठवणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातून राज्यपालांना हटवण्यासाठी आम्ही राष्ट्रपती यांना पत्र पाठवणार आहोत, त्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. यावेळी अनेकजण यावर राज्यपालांनी माफी मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
राज्यपालांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात छत्रपती बद्दल वक्तव्य केले होते. महाराजा, चक्रवर्ती सगळे होऊन गेले, झाले. मात्र चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचं मोठं योगदान असतं, तसचं आपल्या समाजात गुरुचं मोठं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. अशा पद्धतीचे विधान केले होते.
Read also:
- सभागृहातील प्रचंड गोंधळात अभिभाषणानंतर राज्यपालांनी सभागृह सोडला
- राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन
- नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी