मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे असते तर नवाब मलिक यांची हाकलपट्टी केली असती. ठाकरे सरकार कोणाच्या आडून नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे असा घणाघाती टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेला.
राजकारण तापलं: विरोधकांची घोषणाबाजी, तर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पायऱ्यावरच शीर्षासन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. विधानभवनाच्या घोषणाबाजी करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात शीर्षासन केले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यपाल सभागृह सोडून निघून गेले.
सभागृहातील प्रचंड गोंधळात अभिभाषणानंतर राज्यपालांनी सभागृह सोडला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आजपर्यंत राज्याच्या इतिहास असं कधी घडलं नाही. तुरुंगात असणारा एखादा मंत्री अद्यापही पदावर कायम आहे. आमची अपेक्षा फक्त आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर एका मिनिटात त्यांची हकालपट्टी केली असती. संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेतला. मग नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही. त्यांना वाचवण्याचे नेमके कारण काय? त्यांच्या पाठीमागे कोण आहेत? कुणाच्या दबावाखाली त्यांना वाचवले जात आहे. यासंदर्भात आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. खंर तर ठाकरे सरकार यातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
Read also:
- ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, मंत्रिमंडळाची बैठक
- ‘राज्यपाल नव्हे तर भाज्यपाल’; अभिभाषण न करता निघून गेल्यावर राज्यपालांवर शिवसेनेची टीका
- भाजपने राज्यपालांबद्दल भूमिका स्पष्ट करावी; आक्षेपार्ह वक्तव्यांवरून काँग्रेस आक्रमक
- राज्यपालांच्या जाण्यावरून आदित्य ठाकरे म्हणतात… ‘हा तर महाराष्ट्राचा अपमान’
- राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रपतींना 6 हजार पत्र पाठवणार