मुंबई : अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला
1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
महाराष्ट्र हळहळला: सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाने खळबळ
यावेळी त्यांनी मागच्या सरकारमधील एका मंत्र्यावरही गंभीर आरोप केला. फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याने मंदिराच्या जमिनीचा घोटाळा केला होता. त्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजपवाले कसे घोटाळे करत होते हे राज्यातील जनतेला दिसेल, असं त्यांनी सांगितलं.
संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील
एका मुलाखतीत कंगना रणौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, ‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.’
Read Also :
- भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- कंगनाने देशाचा अपमान केलाय, लाज लज्जा असेल तर तिने माफी मागावी – संजय राऊत
- संजय राऊत पिसाळलेलं पात्र, त्यांच्या मेंदूत 21 इंजेक्शन मारण्याची गरज – गोपीचंद पडळकर
- वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा – नीलम गोऱ्हे
- सार्वजनिकरित्या माफी मागून ते ट्विट ४८ तासांत डिलिट करा,अन्यथा…; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा