कोल्हापूर : संजय राऊत रोज काही ना काही बोलत असतात. बोलून बोलून दमतात. आता त्यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना ही खोचक टीका केली.
कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मी स्वत: यामध्ये लक्ष घालीन – राज ठाकरेंच आश्वासन
ते म्हणाले, संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असं सुधीर मुनगंटीवारांनीच सांगितलयं – संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यावरूनही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.
Read Also :
- महाराष्ट्र हळहळला: सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाने खळबळ
- राष्ट्रवादीचा भाजपला दुहेरी दणका: परभणीत ६ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ, यवतमाळचा माजी आमदारही फोडला
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; आज ३०० कामगार निलंबित केले जाणार?
- नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटलांची मागणी
- राजकारणाला बळी पडू नका, संप मागे घ्या, सगळ्यांचेच नुकसान होत आहे – अनिल परब