मुंबई : राज्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मकाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाचा आजचा चौथा दिवस असून हे आंदोलन आणखीनच चिघळलं आहे, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी संपकऱ्यांची आहे. एसटी संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत राऊत म्हणाले की, “एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं.” असं राऊत म्हणाले आहेत.
देशद्रोही ‘नवाब’ हीच तुमची लायकी; पुण्यात नवाब मलिकांचा पुतळा जाळून भाजपच्या वतीने निषेध
पुढे राऊत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. संपापेक्षा, कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपला महाविकास आघाडीच्या बदनामीचं पडलंय. एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही. भाजपमधील उपरे नाचताहेत, तर नाचू देत. सरकार कामगारांच्या बाजूनं आहे, असंही ते म्हणाले आहेत. राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक जुना व्हिडिओ शिवसेनेने शेयर केला आहे. ज्यात मुनगंटीवार बोलतायत की “एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण नाही” याच व्हिडिओचा आधार घेत संजय राऊतांनीही एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोपकरून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील
भाजपच्या संपाला पाठिंब्याबाबत राऊत म्हणाले की, भाजप राजकारण करत आहे. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं. याक्षणी ते शक्य नाहीये तरीही भाजपचे नेते मुद्दाम हा विषय घेऊन नाचत आहेत. शेवटी राज्याचे सरकार कामगारांच्या बाजूने उभे आहे. अनेक बंधने सरकारवर आहेत. त्यामुळे कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे.
Read Also :
- कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मी स्वत: यामध्ये लक्ष घालीन – राज ठाकरेंच आश्वासन
- देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा; नवाब मलिकांच्या लेकीने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस
- कोरोनाकाळात गायब असलेले नेते आता मात्र सक्रीय; निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुकांच्या सोशल मीडियावर घिरट्या
- एसटी संप चिघळणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम
- नियोजन समितीच्या निव़डणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी; भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित