मुंबई : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. यातच आता ठाकरे गटातील नेत्यांचं शिष्ठमंडळ राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा
जालना येथील उपोषण हे मुख्यमंत्र्यांनी करायला लावलेलं होतं. तर आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होते. मात्र सौम्य लाठीचार्ज मोठे झाले. मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची बैठक सुरू होती. या बैठकीतील मुद्यांकडे मुंबईसह साऱ्या देशाचे लक्ष होते. त्या मुद्यावरून लक्ष विचलितत करण्यासाठी जालना येथील लाठीचार्जचे पाप राज्य सरकारने केले असा आरोप नाना पटोले यांनी केलेत.
हेही वाचा…राज्यात काका-पुतण्याचा आणखी एक संघर्ष, काका अजित पवारांवर ‘या’ पुतण्याची पहिल्यांदाच टिका
वटहुकूम काढून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्यांनी राज्यपालांकडे केली. तसेच या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. सरकार आपल्या दारी कार्यक्रमाला घ्यायचा आहे, त्यामुळे सरकारने लाठीचार्ज केला असल्याचाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमधीलच आदेश देणारे खरे जनरल डायर कोण ? असा सवाल देखील त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल