मुंबई : सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारवर आर्थिक बोजा, दिवाळीची गर्दी वाढली म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले, एकत्रित लोकं भेटल्यावर कोरोना वाढतो, हा आमचा अनुभव आहे, कोरोनाच्या काळात भाजपने जेवढी संधी मिळेल तेवढे राजकरण केलं, यावरून एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला, असा असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी
पुणे मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
‘आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही, चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये’
देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देत नाही. शरद पवार यांनी आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
Read Also :
तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे
वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे मगरीचे अश्रू प्रकाश आंबेडकरांची टीका
‘आम्हाला चंपा, टरबुजा बोललेले कसे चालते?’
बॅनरवरून काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फोटो गायब, महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा
‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचा हल्लाबोल