दिल्ली : निवडणूक काही विभागात झाली असेल, पण काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण देशाचं लक्ष टीव्ही, ट्विटरवर होतं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जनतेचं लक्ष होतं. लोकशाहीप्रति भारतीयांची जी आस्था आहे, त्याचं उदाहरण संपूर्ण भारतात कुठेही नाही. निकालात हार-जीत आपल्या जागेवर आहेत. पण निवडणुकीची प्रक्रिया प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा विषय आहे. त्यामुळे मी प्रत्येक भारतीयाचं अभिनंदन करतो.
कोटी कोटी देशवासीयाचं धन्यवाद मानतो. निवडणुकीला शांततापूर्ण आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल निवडणूक आयोग, देशाचं सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचंही अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मी आज महान देशाच्या महान जनतेचे आभार व्यक्त करतो. मी देशाच्या कोटी कोटी नागरिकांना धन्यवाद देतो. लोकशाहीच्या या महान पर्वाला सर्वांनीच उत्साहानं साजरा केला.
लोकशाहीप्रति भारतीयांची जी आस्था आहे, त्याला जगात कुठेच तोड नाही. निवडणुकीत जय-पराभव हा आपल्याला जागेवर आहे. पण निवडणुकीची प्रक्रिया प्रत्येक भारतीयांसाठी गौरवाचा विषय आहे. निवडणुकीला यशस्वीपणे राबवल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे धन्यवाद देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयातून त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे.
काही गोष्टी तर आम्ही विसरलो आहोत. काही वर्षांपूर्वी निवडणूक व्हायची, तेव्हा दुसऱ्यादिवशी किती बुथ लुटले गेले, अशा प्रकारच्या बातम्या यायच्या. मात्र, आज मतदानाचा टप्पा किती वाढला, किती महिलांचं मतदान वाढलं, याबाबत बातम्या असतात. पूर्वी बिहारच्या निवडणुकीत किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले गेले, अशाच बातम्या असायचा. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीतही शांततापूर्ण मतदान झाले. कोरोना संकटात मतदानासाठी लोक घराबाहेर पडले, हीच तर खरी ताकद आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे.
Read Also :
भाजपच्या ‘या’ नेत्याने धरला काँग्रेसचा ‘हात’ भाजपला पडले मोठे खिंडार
मुख्यमंत्रीपद मिळाल्यास नितीश कुमारांनी त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं : संजय राऊत
काय बोलताय? अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांची ‘नात’ नागपूरकर?
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका