मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे सूत्रे हाती घेणार असल्याच्या बातम्या गेली काही दिवसांपासून सर्वत्र चालू आहेत. अजित पवार हे पुन्हा बंड करणार का? आणि राज्यात पुन्हा राजकीयभूकंप होणार का? असे अनेक सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित आहे.
अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून दौरे रद्द करून काही राजकीय घडामोडींमध्ये व्यस्थ आहेत. अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईला निघाले होते. पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात असताना मुंबईत बैठक कशी काय असा सवाल उपस्थित केला जात होता शरद पवारांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आलीय का अशीही चर्चा सुरु झाली होती.
हेही वाचा… “३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम”; बावनकुळेंचं पुन्हा मोठे विधान
विशष म्हणजे आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गोटातील हालचालींना वेग आल्याचं सांगितलं जातंय.अजित पवार यांच्या या निर्णयासाठी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि आमदारांच्या संमतीच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि धक्कादायक म्हणजे अजित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे.
या सर्व महाराष्ट्रातील राजकीय वारे बदलणाऱ्या घडामोडी चालू असताना अजित पवार ज्या पक्षासोबत युती करणार आहेत त्या पक्षाचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काहीच भाष्य करताना दिसत नाहीये. यामुळे पडद्यामागे नेमकं काय चालू आहे असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, २०१९ विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहाटेचा शपथविधी झाला. त्यानंतर आमचं सरकार काही तासांतच कोसळलं. परंतु त्यानंतर आम्ही अनेक दिवस भेटलो नाही. लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असल्यामुळं अजित पवारांनी अनेकदा मला भेटणं टाळलं होतं असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलखाती मध्ये केला होता
हेही वाचा… महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल..!
फडणवीसांच्या या भाष्यानंतर २०१९ च्या शपथविधीवेळी देवेंद्र फडणवीस याना ८० तासात सत्ता गमवावी लागली. त्यामुळे त्यांना अजित पवारांवर विशेष डळमळला आहे का? कि भूकंप होण्याच्या आधीची हि देवेंद्र फडणवीसांची शांताता आहे. असे अनेक सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाले आहे. तसेच अजित पवार भाजप सोबत यायचं ठरवलं तर एकनाथ शिंदे याची प्रतिक्रिया काय असेल? त्यांना हि युती मेनी नसेल तर देवेंद्र फडणवीस शिंदे गट बाजूला करत अजित पवार यांच्या सोबत सत्ता प्रस्थापित करतील का? हे पाहणे देखील महत्वचाई ठरणार आहे.
Read also
हेही वाचा… Breaking News : अजित पवार यांनी सोशल अकाउंटवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!
हेही वाचा… दोन दिवसांपासून नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल; अजित पवारांसोबत बैठक..!
हेही वाचा… “अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य”; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने दिलं जाहीर समर्थन