मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या 236 वरून 227 करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजीच्या अध्यादेशाला व त्यानंतर पारित झालेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शुक्रे व न्यायमूर्ती चंदवाणी यांच्या खंडपीठाने फेटाळल्या. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निकाल जाहीर करण्यात आला.
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!
सविस्तर निकालाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. महाविकासआघाडी सरकार असताना मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अध्यादेश काढून ही संख्या पुन्हा एकदा 227 केली, याविरोधात ठाकरे गटाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती.
शासनाने दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश काढून मुंबई महानगरपालिकेच्या सदस्यांची संख्या 227 वरून 236 केली होती. सदर अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत अध्यादेश योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित
उच्च न्यायालयाच्या आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. 236 सदस्य संख्येच्या आधारे मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण व मतदार संख्येची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली होती. मात्र राज्य शासनाने दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी पुन्हा अध्यादेश काढून 236 सदस्य संख्या कमी करून 227 केली होती व राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी केलेली प्रभागरचना, आरक्षण व मतदार यादीची कार्यवाही निरस्त केली होती.
Read also
हेही वाचा… मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु
हेही वाचा… अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द अन् बावनकुळेंनी दिला ग्रीन सिग्नल..!
हेही वाचा… ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’, मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
हेही वाचा… “पवारांच्या मूक संमतीनेच राष्ट्रवादीचे लोक भाजपकडे जाणार”, शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा