राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजून लागल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. 16 आमदार अपात्र झाल्यावर शिंदे यांना पायउतार व्हावं लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मात्र सरकार जाणार नसल्याचं वाटतं.
16 आमदार बाद झाले तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. सरकार जाणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यासाठी अजित पवार यांनी हे सरकार कसं टिकेल याचं गणितच समजावून सांगितलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
हेही वाचा… नाशिकमध्ये राजकीय भूकंप, भुजबळांचे निष्ठावंतसह माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 आमदार डिस्क्वॉईलड होतील असं सांगितलं जातं. आता अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. त्यात 106 भाजपचे आमदार आहेत. तर 9 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. असे मिळून 115 आमदार भाजपकडे आहेत. तर एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार आहेत. शिंदे यांच्यासोबतचे 10 अपक्ष बाजूला ठेवा. कारण अपक्ष सत्ता असते तिकडे जातात. तूर्तास त्यांना गृहित धरू नका. शिंदे यांच्याकडे केवळ 40 आमदार आहेत असं समजा.
हेही वाचा… ‘फडणवीस हे जादूगार, भविष्यात काय जादू करायची हे जादूगरच ठरवतो’
शिंदे यांचे 40 आमदार आणि भाजपचे 115 आमदार मिळून आमदारांची संख्या 155 होते. शिवाय आठ दहा लोकं म्हणजे बच्चू कडू, रवी राणा आणि इतर असे 10 अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे115, 10 आणि 40 आमदारांची गोळाबेरीज केल्यास ही संख्या 165 होतात. त्यातील 16 आमदार अपात्र होऊन कमी झाले. तर युतीकडे 149 आमदार उरतात. बहुमताचा जो आकडा आहे, म्हणजे मॅजिक फिगर 145 आहे. मग कारण नसताना वावड्या उठवण्याचं काम का सुरू आहे? असा सवाल अजित पवार यांनी केला.
Read also
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण
हेही वाचा… अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटरचं कनेक्शन नाशकात, STF ने एकाला घेतलं ताब्यात..!
हेही वाचा… माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक