जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्लाप्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केल्याने देशात एकच खळबळ माजली असताना,आता महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यात जी 300 किलोची स्फोटके वापरण्यात आली, ही स्फोटके नागपूरमधून गेल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे.
हेही वाचा… महाविकासआघाडीच्या सभेत का बोलणार नाही?, अजित पवारांचं स्पष्टीकरण
रविवारी नागपूरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली होती. या सभेत नाना पटोले यांनी पुलवामा हल्ल्यावर मोठं विधान केले होते. पुलवामात जो हल्ला झाला, या हल्ल्यात 300 किलोची स्फोटके वापरण्यात आली होती. ही स्फोटके नागपूरमधून गेल्याचा दावा नाना पटोले यांनी या सभेत केला.
हेही वाचा… अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटरचं कनेक्शन नाशकात, STF ने एकाला घेतलं ताब्यात..!
विशेष म्हणजे,या प्रकरणाची तपास सीबीआय लावली होती.या घटनेला आता साडे तीन-चार वर्ष उलटले आहेत. मात्र नागपूरमधून जी स्फोटके गेली होती, ती कुठून गेली? कोण पाठवणारा होता, याची अद्याप चौकशी झाली नाही, अशी माहिती पटोले यांनी दिली.तसेच ही परिस्थिती भयावह असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read also
हेही वाचा… “पवारांच्या मूक संमतीनेच राष्ट्रवादीचे लोक भाजपकडे जाणार”, शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा… अजित पवार पुन्हा कुठे गेले?, राजकीय चर्चांना उधाण..!
हेही वाचा… “16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री”, अजित पवारांनी सांगितलं गणित