मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांनी काश्मिरातील कलम ३७० हटवण्यात आलं असून आता हळूहळू जम्मू आणि काश्मीरमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण आता तेथे कलम ३७० पुन्हा लागू व्हावं म्हणून काही भारतविरोधी शक्ती काम करत असून त्यात काँग्रेसही सहभागी झाली आहे.
गुपकर ठराव काँग्रेसला मान्य आहे का? देश तोडणाऱ्या शक्तींच्या अजेंड्याला काँग्रेस मान्य करते का? असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुंबईतील दादर मध्ये भाजपची कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सरकारकडून लोकांना कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रवासीयांशी विश्वासघात केली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ऊर्जा विभागाची स्थिती अतिशय उत्तम असून त्याला नीट चालवण्यासाठी मंत्री नितीन राऊत कमी पडत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
Read Also ;
बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही, महापौर पेडणेकरांचा भाजपला टोला
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा