मुंबई : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं जागतिक निविदा काढल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का?, अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.
अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. लस खरेदी प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली अडकली याचा राज्य तातडीने खुलासा करून सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जागतिक निविदा काढण्याची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याबाबतच्या वाटाघाटींचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर वृत्तपत्रामधून निविदा जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र महिना उलटूनही या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. अगोदरच, महाराष्ट्र सरकारच्या विश्वासार्हतेवर वाझेसारख्या वसुली प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरून या निविदांना प्रतिसाद न मिळण्यात असेच काही कारण नसावे ना, अशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने खुलासा करून पारदर्शकतेची हमी दिली पाहिजे” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.
Read Also :
- ‘आपलं इतक्या वर्षांचं नातं क्षणात…सगळे खंबीर राहा!’, राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक पत्र
- सचिन सावंत म्हणजे “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”
- कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तात्काळ रद्द करा; बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांची मागणी
- ‘…तर मी प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणेन,’
- शिवसेना आमदाराची गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट फसला