मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी घडवली आणली असून, दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांसोबतच, राज्याच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कोकणचा दौरा केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेला कोकण दौरा हा विरोधकांसाठी आता टीकेचा विषय बनला असून, यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आज सकाळी भाजपचे नेते नारायण राणे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी दौरा असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
तसेच, ‘कोकणावासीयांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत काय दिलं? नुकसानीची पाहणी करून गेल्यावर दोन दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर करायला हवं होतं, त्यांनी ते अजून का केलं नाही? केवळ ३ तासांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, पण या वादळात लोकांचं किती नुकसान झालं, किती लोकांचे रोजगार गेले याची साधी माहिती देखील त्यांनी लोकांकडून घेतली नाही. त्यांनी लोकांची का भेट घेतली नाही?,” असे सवाल विचारात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावेळी, ‘ठाकरे सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरु असून, तो ,मी पुराव्यानिशी समोर आणेन. मंत्रालयात फक्त टक्केवारीसाठी कामं चालतात. महामारीच्या औषधांच्या निविदेमध्ये पैसे खाल्ले जात आहेत. पोलीस वसाहतीच्या निविदेमध्येही भ्रष्टाचार झाला असून, संजय राऊतांनी हे सगळं जाहीर करावं, नाहीतर प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी नावानिशी उघडपणे जाहीर करेन,” असा त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि ठाकरे सरकारला दिला आहे.
Read Also :
- शिवसेना आमदाराची गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट फसला
- “उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला”
- ‘मराठा क्रांती मोर्चाचा आणि विनायक मेटेंच्या मोर्चाचा काहीही संबंध नाही’
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अहमदनगरच्या ‘कुकडी’ खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे, राम शिंदेंचा आरोप
- ‘आरक्षणासाठी संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देणार?’