मुंबई : सध्या राज्यात महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, आणखीही दोन नवीन साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. दरम्यान, या काळात देखील सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते पक्षासाठी आणि समाजकार्यासाठी झटत आहेत. मात्र, महामारीने या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील आपल्या दाढेत ओढले आहे.
या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांत्वनपर पत्र पाठवलं असून, महामारीमुळे आपल्याच कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना मनात ठेवत त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचं याद्वारे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, हे धीर देणारं पत्र तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी विभाग अध्यक्षावर सोपवली आहे.
त्यांच्या पात्रातील आशय…
‘आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. मनाला अतिशय वाईट वाटले. आपल्या पूर्ण कुटुंबावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची मी फक्त कल्पनाच करु शकतो. आपलं असणाऱ्या माणसाचं इतक्या वर्षांचं नातं असं एका क्षणात अनंतात विलीन होणं. हा खरचं खूप मोठा धक्का आहे. या प्रसंगाला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे. हा काळ दुःखाचा असला तरी, आपण खंबीर राहून, आपल्या जवळच्यांच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायाची आहे. आपण एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा. आपल्या कुटुंबातल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबिय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.’
आपला नम्र,
राज ठाकरे
Read Also :
- ‘…तर मी प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणेन,’
- शिवसेना आमदाराची गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट फसला
- “उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला”
- ‘मराठा क्रांती मोर्चाचा आणि विनायक मेटेंच्या मोर्चाचा काहीही संबंध नाही’
- ‘आरक्षणासाठी संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देणार?’