मुंबई : राज्यात सोमवारपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांना अधिवेशनाच्या कालावधीवरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनीही दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही असं सांगितलं.
अनेक प्रश्न आहेत. दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधकांनी एकत्र बसून एक नियमावली तयार करता येईल. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचं अधिवेशन घेतलं जाऊ शकतं. पुढील अधिवेशन नियमित होईल अशी कारवाई केली पाहिजे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
मुनगंटीवार काय म्हणाले –
“आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे,” असं मुनगंटीवार म्हणाले.
Read Also :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’
गोपीचंद पडळकर यांचं धनगरी वेष परिधान करुन ढोल वाजवत आंदोलन
… तर या शेतकऱ्यांशी चर्चा का करत आहात ? चिदंबरम यांचा मोदी सरकारला खोचक सवाल